सर्वात मोठी बातमी! धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा,फक्त मंत्रिपद नाही, तर आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार, धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

“काल तर तुम्ही ठणठणीत दिसत होता. सगळ्यांची गप्पा टप्प्या भेटीगाठी सगळं झालं आणि तुम्हाला डॉक्टरांनी का रात्रीच सल्ला दिला. अरे तुम्हाला लाज नाही येणार म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही त्याची हकालपट्टी झाली पाहिजे. त्याला बडतर्फ केलं गेलं पाहिजे आणि आता धनंजय मुंडेंना माझा चॅलेंज आहे. मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणारे आणि माझी आदरांजली संतोष देशमुखांना मी राजीनामा सोडा त्यांची आमदारकी रद्द झाल्यानंतर मी जाऊन पुन्हा एकदा येऊन संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भेटेन. हीच माझी त्यांना आदरांजली असेल”, असेही अंजली दमानियांनी म्हटले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर 82 दिवसानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्र्याकंडे सादर करण्यात येणार आहे. त्यांचे पीए राजीनाम्याची कॉपी घेऊन सागर बंगल्यावर पोहचले आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर 82 दिवसानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्र्याकंडे सादर करण्यात येणार आहे. त्यांचे पीए राजीनाम्याची कॉपी घेऊन सागर बंगल्यावर पोहचले आहेत. तर तातडीने मुख्यमंत्री विधानभवनाकडे निघाले होते.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे, अशी घोषणा प्रसार माध्यमांसमोर दिली. आपण हा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवल्याचे, मुंडे यांना पदमुक्त केल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. तेव्हाच विरोधकांनी ही अत्यंत क्रूर हत्या झाल्याचा आरोप केला होता. काल समाज माध्यमांवर सीआयडीच्या दोषारोप पत्रा सोबतचे फोटो समोर आले. त्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत.
विरोधकांनीच नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुद्धा अत्यंत जहाल प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यानंतर आज सकाळपासूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. धनंजय मुंडे यांना कालच राजीनामा दिल्याचा दावा करण्यात येत होता. तर आज सकाळपासून विरोधकांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.



