“आमदार मुक्कामी आपल्या गावी अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
आ.समाधान आवताडे यांच्या सुराज्य ग्राम मुक्काम मोहिमेतून प्रत्यक्ष कामांची पाहणी

“आमदार मुक्कामी आपल्या गावी अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
आ.समाधान आवताडे यांच्या सुराज्य ग्राम मुक्काम मोहिमेतून प्रत्यक्ष कामांची पाहणी
सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ‘सुराज्य ग्राम मुक्काम मोहिमेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ येथे भेट देऊन गावातील विविध शासकीय सुविधा आणि सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी आमदार समाधान आवताडे यांनी केली.
यावेळी सरकारी दवाखाना (PAC), अंगणवाडी, तलाठी कार्यालय, नवीन ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषदशाळा, अभ्यासिका तसेच पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट देऊन तेथील सुविधा, उपलब्ध व्यवस्था आणि आवश्यक सुधारणांबाबत माहिती घेतली.
यावेळी सहाय्यक उपायुक्त जगन्नाथ सुरवसे डॉ तानाजी भोसले, डॉ बोर्डे,डॉ विशाल कुंभार, डॉ प्रमोद आदलिंगे, डॉ सत्यजित लामकाने, डॉ समाधान साळुंखे,डॉ मुमताज आतार,डॉ नेमाणे , डॉ समाधान माळी,डॉ अनिल बळछत्रे, डॉ कोरे उपस्थित होते.उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ शिवपुजे प्रांताधिकारी बी आर माळी तहसीलदार मदन जाधव सरपंच ऋतुराज बिले यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
यावेळी सर्व संबंधित शासकीय अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थांसोबत आढावा बैठक घेऊन गावातील आरोग्य, शिक्षण, पाणी, रस्ते, महसूल, पशुसंवर्धन, ग्रामविकास तसेच इतर स्थानिक प्रश्नांवर नागरिकांशी थेट संवाद साधला. नागरिकांनी मांडलेल्या अडचणी समजून घेत संबंधित विभागनिहाय प्रश्नांची नोंद करून आवश्यक कार्यवाही करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
प्रशासन गावात येऊन नागरिकांचे प्रश्न प्रत्यक्ष जाणून घेणे, उपलब्ध शासकीय सुविधांची वस्तुस्थिती तपासणे आणि त्याच ठिकाणी संबंधित यंत्रणेशी चर्चा करून पुढील कार्यवाही निश्चित करणे, हा या मोहिमेमागील महत्त्वाचा उद्देश आहे. त्यामुळे पाठखळमधील प्रत्येक शासकीय सुविधा नागरिकांसाठी अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्यासाठी आवश्यक बाबींवर यावेळी विशेष लक्ष दिले.
गावातील प्रलंबित प्रश्नांना गती मिळावी, शासकीय योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचावा आणि मूलभूत सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा व्हाव्यात, यासाठी संबंधित विभागांशी समन्वय ठेवून पुढील पाठपुरावा करण्यात येईल. सुराज्य ग्राम मुक्काम मोहिमेच्या माध्यमातून प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक मजबूत करून पाठखळच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.




